वणी /
वणी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी रात्री ८ वाजता पार पडली.
यावेळी सहा पोलिस निरीक्षक शेखर वांढरे उपस्थित होते.
रमजान ईद, रामनवमी, भगवान महावीर जयंती, हनुमान जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वणी पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता कमेटीची सभा आयोजित करण्यात आली होती.
या वेळी वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रमजान ईद, रामनवमी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती शांतपणे उत्सव साजरे करावे. कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये याची दक्षता घ्यावी, असे सांगितले.
यावेळी पुरुषोत्तम पाटील सर, रवि बेलुरकर, मंगल तेलंग, यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.
यावेळी राजाभाऊ पाथ्रडकर, नारायण गोडे, दिपक छाजेड, रमेश येरणे, संतोष डंभारे, सत्यजित ठाकुरवार, नितीन बिहारी, आशिष डंभारे, सौ शालिनीताई रासेकर, मंदाताई बांगडे, विजयाताई आगबत्तलवार,सौ. आरती वांढरे, सौ सुमित्राताई गोडे यांच्या सह महिला प्रतिनिधी व पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावर्षी श्री राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी होणार
दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री राम नवमी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. २२ वर्षांपासून सर्व धर्माचे सहकार्य लाभत असुन मला कोणत्याही समाजाचा त्रास झाला नाही असे श्री राम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी शांतता कमेटीच्या बैठकीत सांगितले.