वणी :
वणी ते मुकुटबन या महत्त्वाच्या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून संपूर्ण रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहने धावत असतात. मात्र खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
विशेषतः दुचाकीस्वारांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे अनेक खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने वाहनांचे संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.